Friday, February 22, 2019
बिगुल
Advertisement
  • मुख्यपान
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कला-साहित्य
  • समाज
  • अर्थ
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • करिअर
  • मीडिया
  • दिवाळी अंक
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कला-साहित्य
  • समाज
  • अर्थ
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • करिअर
  • मीडिया
  • दिवाळी अंक
No Result
View All Result
बिगुल
No Result
View All Result
Home देश-विदेश

पण मग ‘अन्याय’ म्हणजे काय?

न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरणात तपासाचा आदेश देण्यासाठी पुराव्यांहून अधिक गरज उदात्त सामाजिक दृष्टिकोनाची होती. हाच सर्वोच्च न्यायालयाचा न्याय असेल, तर मग अन्याय म्हणजे काय?

टिम बिगुल by टिम बिगुल
May 5, 2018
in देश-विदेश
0
पण मग ‘अन्याय’ म्हणजे काय?
0
SHARES
Share on FacebookShare on Twitter

न्यायाधीश लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विशेष चौकशीची मागणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यावरून सत्ताधारी पक्षासह सरकारी भाट व भक्तांनी परमानंदाची टाळी वाजवत विरोधकांना (यात काँग्रेससह समविचारी राजकीय पक्षांसह लोकशाहीवादी संघटना व विचारवंतही आहेत) वाकुल्या दाखविण्याची संधी साधली आहे. गुरुवारचा दिवस सोशल मीडियात याच परस्परविरोधी दाव्यांसाठी राखीव होता. कारण एका न्यायाधीशाच्या मृत्यूचे हे प्रकरण आहे आणि याप्रकरणी आतापर्यंतच्या एकूण घडामोडी अन्यायात भर टाकणाऱ्या असल्याचीच बहुसंख्य विचारींची भावना आहे. या देशात जर न्यायाधीशांना न्याय मिळू शकत नसेल तर, सर्वसामान्यांनी काय न्याय मिळण्याची अपेक्षा करायची, असाच सवाल अनेकांच्या मनात आहे. अगदी मलाही सर्वोच्च न्यायालयाचा आदर आहे. तीच एकमेव यंत्रणा विश्वासपात्र असल्याची आम्हा सर्वसामान्य भारतीयांची भावना आहे. पण याच भावनेला तडा गेल्यासारखं आज वाटतय. आणि मनाला प्रश्न पडलाय की, हाच जर ‘न्याय’ असेल, तर अन्याय म्हणजे नेमकं काय..!

सुप्रीम कोर्ट सुप्रीम अथॉरिटी… त्यांच्या ‘न्याया’बद्दल लिहिल्यास कोर्ट ऑफ कंटेम्टचं झेंगटं मागे लागू शकतं. अशीच आम्हा सर्वसामान्यांची भावना. पण तरीही या प्रकरणी न राहवल्याने हा विचार बाजूला सारून लिहावसं वाटतयं हे नक्की. कायदा पुरावे मागतो. तेच नसल्यानेही आदरणीय न्यायाधीशांनी ही मागणी फेटाळली असेल. हरकत नाही. पण मग असलेले पुरावे नष्ट करणाऱ्यांचे काय? त्यांना ही सिस्टिम अशीच मोकाट सोडणार का? अमित शहा यांचे नाव या लोया मृत्यू प्रकरणात असल्याने खासगीत बोलायचीही भीती आहेच. तिथं लेख लिहिण्याचं दडपणही आहेच की. असे कितीजण या भीतीच्या सावटाखाली या केसबद्दल बोलत नाहीत, असाही प्रश्न आज पडतोय.

मिलॉर्ड, तुमची न्यायबुद्धी पुराव्यानुसारच निर्णय देणार. मान्य. पण या केसचे शेकडो न सुटणारे कोडेवजा राजकीय व गुन्हेगारी प्रश्न दुर्लक्षित करण्याजोगे नक्कीच नाहीत. सत्ताधारी भाजपाचे सुप्रीमो (अध्यक्ष) शहा यांच्यासारख्या ‘जबाबदार’ व्यक्तिचे नाव यात आहे. त्यातही या केसचे मूळ आहे सोहराबुद्दीन आणि प्रजापती खटला. याच खटल्यामध्ये सुनावणीदरम्यान २०१२ मध्ये न्यायाधीशांची बदली करण्यात आली. तसेच २०१४ पासून नंतच्या न्यायाधीशांच्या बदल्याही संशयास्पदच आहेत. याच प्रकरणाची जबाबदारी स्व. लोया यांच्यावर होती. याच्याच सुनावणीदरम्यान तारिख पे तारिख न करता निकालासाठी जलद तपास व इतर कारवाईसाठी लोया यांचे आदेश होते. परंतु, सोहराबुद्दीन बनावट एनकाउंटर प्रकरणाची सुनावणी गुजरात भाजपासाठी जाचक होती. दरम्यानचं लोया यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल शेकडो प्रश्न अनुत्तरित आहेत. आणि आता तर विशेष चौकशीपूर्वी ही केस सुनावणीसाठी देताना सिनियारिटी डावलल्याचेही आरोप माननीय न्यायाधीशांनीच केलेले आहेत. या सर्व संशयास्पद घटनांच्या पार्श्वभुमीवर विशेष चौकशी पथकाची मागणी सुप्रिम कोर्टाने फेटाळली…

यानंतर भाजपाईंसह भक्तांचा विखारी चित्कार अनेक प्रश्न निर्माण करणाराच आहे. हे एकच प्रकरण नाही. मालेगाव बाँबस्फोट असो की हैदराबाद प्रकरण. सगळ्यांतच न्यायालयाकडून पुराव्याअभावी सुटका झालेले भगव्या कपड्यांतले आहेत. मालेगावप्रकरणी निकाल देताना तर शहीद हेमंत करकरे यांच्याच तपासाला डावलल्याचे आम्ही पाहिले आहे. करकरेंबद्दलही प्रश्न अनुत्तरीत आहेत. तसेच दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी प्रकरणामुळेही अनेकजण भीतीच्या सावटाखाली आहेत. यापूर्वी मुस्लिम कट्टरवादी व जिहादींसह नक्षलींची भीती होती. आता भगव्या संस्कृतीरक्षकांचीही भीती वाटतेय…
किती दिवस ही न्यायवादी भीती आम्हा सर्वसामान्य भारतीयांच्या पाठीशी राहणार? ही कमी करण्याची जबाबदारी व्यवस्थेची आहे. पण व्यवस्थेवरचाही विश्वास आमचा संपत आलाय. सुधारणा करण्याऐवजी व्यवस्थाच उलथून टाकणारे शिरजोर होत आहेत. अशावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने कागदोपत्री पुराव्यांऐवजी परिस्थितीजन्य पुराव्यांवर काही बाबींवर निकाल देण्यास काय हरकत आहे? काही प्रकरणांवर तसा न्यायवादी दृष्टिकोन दाखविला जातोच की. आम्ही खूपदा वाचलंय याबद्दल. मग असल्या प्रकरणांवरही काय हरकत आहे उदात्त सामाजिक दृष्टिकोन ठेऊन न्यायदानाची..! जर, हाच आपल्या भारतीय व्यवस्थेचा ‘न्याय’ आहे. तो उन्मादाने अधोरेखितही होतोय. मग ‘अन्याय’ म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे…???

Tags: अन्यायन्यायाधीश लोया
टिम बिगुल

टिम बिगुल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिवाळीअंक

कथा घसरत्या कार्यमूल्याची
दिवाळी अंक

कथा घसरत्या कार्यमूल्याची

by अनुवाद: डॉ. राजेश पुसाळकर
November 9, 2018
0

कार्यमूल्यांबाबतच्या दृष्टिकोनांतील फरक दाखवणाऱ्या एका जर्मन कथेचा हा अनुवाद...

असगर वजाहत यांच्या कथा

असगर वजाहत यांच्या कथा

November 9, 2018
महिनों अब मुलाकाते नही होती…

कविता… कविता…

November 9, 2018
दुसरी बाजू

दुसरी बाजू

November 9, 2018
न्यूज जॉकीचा पुनर्जन्म

टिमलखलख ते टिमलखलख

November 9, 2018
कृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह

कृष्णा: मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह

November 9, 2018
इस्लाम आणि बहुपत्नीत्व

न्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार?

November 9, 2018
रडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण

रडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण

November 9, 2018
नाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…

नाणार रिफायनरी: पिक्चर अभी बाकी है…

November 9, 2018
प्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी

प्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी

November 9, 2018

आमची शिफारस

Nandu Gurav writes blog about Congress party situation in Sangli district

सांगलीच्या बालेकिल्ल्याची वाताहत काँग्रेस कशी रोखणार?

by टिम बिगुल
February 21, 2019
0

नंदू गुरव, सांगली सांगली : शत्रूशी लढ लढ लढून पूर्वजांनी एखादा किल्ला काबीज करावा, त्यावर बसून वाचक बसेल असा कारभार...

priyadarshan writes about Literary namvar singh

नामवर सिंह : प्राणवायू देणारा वृक्ष

by प्रियदर्शन
February 21, 2019
1

गेले वर्षभर हिंदी साहित्याच्या आकाशात मृत्यू घिरट्या घालतोय जणू. गेल्यावर्षी १९ मार्चला केदारनाथ सिंह यांच्यापासून आज १९ फेब्रुवारीपर्यंत नामवर सिंह...

megha pansare writes blog about four years after govind pansare death

आता ठरवा, तुम्ही कोणत्या बाजूला आहात!

by टिम बिगुल
February 20, 2019
0

मेघा पानसरे२० फेब्रुवारी २०१९. कॉम्रेड पानसरेंना जाऊन चार वर्षे उलटली. अजूनही ती सकाळ, हिंसेचा प्रत्यक्ष थरार जसाच्या तसा आठवतो. घरासमोरच...

congress challenges shiv sena bjp by asking 10 questions

युतीला काँग्रेस पक्षाचे दहा प्रश्न

by टिम बिगुल
February 19, 2019
0

मुंबई : भाजप शिवसेना अभद्र युतीच्या पार्श्वभूमीवरती अफझल खानाशी युती करणा-याला शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा केली असती, असे सांगून शिवसेनेला...

सर्वात लोकप्रिय

  • Shripad brahme writes review of marathi movie anandi gopal

    केवळ नतमस्तक…!

    152 shares
    Share 152 Tweet 0
  • नामवर सिंह : प्राणवायू देणारा वृक्ष

    1 shares
    Share 1 Tweet 0
बिगुल

© 2018 बिगुल
Developed by UI10.COM

संपर्क साधा

  • संपर्क

सोशल मिडीया

No Result
View All Result
  • Home

© 2018 बिगुल
Developed by UI10.COM